जळगाव : वेदांता प्रकल्पा्साठीची सर्व प्रक्रिया अंतिम टप्प्यात हा असतांना प्रकल्प गुजरातकडे वळविला गेल्यात यात मोठे राजकारण आहे, अजूनही वेळ गेलेली नाही. महाराष्ट्राच्या अस्मितेचा हा विषय असून यासाठी सर्व पक्षांनी एकत्र यावे. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शहा यांची भेट घ्यावी’ असे खडसे यांनी वक्तव्य केले.
तसेच ते म्हणाले, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले होते, की ते मोदींचे हस्तक असून काम करतोय. मात्र हस्तकाचे काम महाराष्टातील प्रकल्प गुजरातकडे वळविण्याचे नव्हे; तर तोच प्रकल्प इकडे आणला तर मुख्यमंत्र्यांचा संपूर्ण महाराष्ट्र गौरव करेन. अजूनही वेळ गेलेली नाही. राज्य सरकारने प्रतिष्ठा पणाला लावून हा प्रकल्प पुन्हा राज्याकडे आणावा असेही खडसे यांनी भाष्य केले.