माणदेश एक्सप्रेस न्युज : सांगली/प्रतिनिधी : बड्या धेंड्यांना माफी व शेतकऱ्यांच्यावर जप्ती असे धोरण जिल्हा मध्यवर्ती बँकेचे सुरू आहे. हे धोरण मोडुन काढु अशा इशारा देवून सोमवार दिनांक 29 जानेवारी रोजी सांगली जिल्हा मध्यवर्ती बँके समोर “बोंब ठोको” आंदोलन करणार असल्याचा इशारा स्वाभिमानीचे जिल्हाध्यक्ष महेश खराडे यांनी दिला.
जिल्हा मध्यवर्ती बँकेने बंड्याना माफी व जिल्हातील शेतकऱ्यांच्यावर जप्तीचे आदेश काढले आहेत. सध्या सांगली जिल्ह्यात दुष्काळी परिस्थिती आहे. ओढे, नद्या, नाले, विहिरी कोरडे पडले आहेत. याचा फटका ऊस, द्राक्ष, डाळिंब, भाजी पालासह सर्वच पिकांना बसला आहे. या परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेवून राज्य सरकारने कर्ज वसुलीला स्थगिती दिली आहे.
तरीही जिल्हा बँकेने वसुलीचा धडाका लावला आहे. मात्र ही बँक मोठ्या राजकीय धन दांडग्या कर्ज दारासमोर नांगी टाकते आणि सर्व सामान्य कर्जदारांना मात्र जप्तीची भीती दाखवते हे बँकेचे धोरण आम्ही चालू देणार नाही. जो पर्यंत बड्याची कर्जे वसूल केली जात नाहीत तो पर्यंत आम्हीही शेतकऱ्याची जप्ती होवू देणार नाही. बँकेच्या या धोरणा विरोधात बँके समोर सोमवार दिनांक 29 जानेवारी रोजी सकाळी अकरा वाजता सांगली पुष्पराज चौकातील मुख्य कार्यालया समोर आंदोलन करण्यात येणार आहे.
तरी ज्या शेतकऱ्यांना बँका, पतसंस्था, राष्ट्रीयकृत बँका, सहकारी बँका जप्ती ची कार्यवाही करत आहेत त्या सर्वांनी सोमवारी सकाळी अकरा वाजता हजर राहावे असे आवाहन खराडे यांनी केले आहे. ही बँक शेतकऱ्याची आहे की, मूठभर जिल्ह्यातील राजकीय पुढाऱ्यांची आहे हा खरा प्रश्न आहे. सहकारी संस्थांवर भरमसाठ कर्जे काढायची त्या कर्जावर आय्याशी करायची ती बुढवायची असला धंदा सुरू आहे तो बंद पाडू असा इशाराही त्यांनी दिला.