सांगली : आषाढी पायीवारी सोहळ्यासाठी पंढरपूरच्या दिशेने निघालेल्या वारकाऱ्यांच्या दिंडीमध्ये जीप घुसल्याने अपघात झाला आहे. या अपघातात १४ वारकरी जखमी झाल्याचे समजत आहे.
वारकरी आपल्या लाडक्या विठुरायाच्या ओढीने पंढरपूरच्या पायी दिंडीवारी पंढरपूराकडे जात असताना मिरज-पंढरपूर राष्ट्रीय महामार्गवरील केरेवाडी फाट्याजवळ वारकरच्या दिंडीत पिकअप जीप घुसल्याने मोठा अपघात झाला आहे. या अपघातात झाला असून यामध्ये जवळपास १४ वारकरी जखमी झाले आहेत.
दरम्यान, या जखमींना मिरज सिव्हिल आणि कवठेमहांकाळ येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे. तर अपघातानंतर जीप ड्रायव्हर पळून गेला आहे.