माणदेश एक्सप्रेस न्युज : आटपाडी/प्रतिनिधी : आटपाडी शहरातील प्रसिद्ध किराणा व्यापारी दत्तात्रय उद्धव कवडे यांचे काल दिनांक ०४ रोजी वयाच्या ७४ व्या वर्षी अल्पशा आजाराने दु:खद निधन झाले. त्यांच्या दु:खद निधनाने परिसरातून हळहळ व्यक्त आहे.
आटपाडी शहरातील चौंडेश्वरी पतसंस्थेचे ते संस्थापक व्हा. चेअरमन होते. त्याच बरोबर आटपाडी विणकर सोसायटीचे संचालक होते. माजी जिल्हा परिषद सदस्या जयश्री कवडे यांचे ते पती होते.
त्यांच्या पश्चात दोन मुले, मुलगी तसेच सुना, नातवंडे असा परिवार आहे. त्यांच्या तिसऱ्या दिवशीचा रक्षाविसर्जन दिनांक ०६ रोजी आटपाडी येथील स्मशानभूमीत होणार असल्याची माहिती त्यांच्या नातेवाईकांनी दिली.